
वर्धा – आताच्या काळात शेती करणे हे अवघड झाल्याच्या चर्चा अनेक शेतकरी करतात. मात्र, या चर्चांना फाटा देत वर्धा जिल्ह्यातील सुकळी या गावातील युवा शेतकरी मनोज पोकळे यांनी 20 एकर शेतात यांत्रिकीकरणाची जोड घेत भाजीपाल्यापासून ते पाच ते सहा उत्पन्न ते घेत असतात. यामध्ये कपाशी, तूर तसेच वांगी अशा पिकांचे ते उत्पन्न सुद्धा घेत असतात. हे पीक घेत असताना त्यांनी कृषी विभागाचे मार्गदर्शन घेतले त्यामध्ये त्यांनी यांत्रिकीकरणांमध्ये भर देत विविध योजनांचा लाभ घेतला. काळानुरूप शेती पध्दतीमध्ये मोठे बदल होत आहेत. आधुनिकीकरण आणि नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे आता उत्पादनवाढीसह शेती फायद्याची होत आहे. कमी पाऊस आणि पाण्याची कमतरता यामुळे शेतकऱ्यांना शेती करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यावर मल्चिंग पेपर सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरू शकतो याचं उत्तम उदाहरण हे युवा शेतकरी ठरत आहे.
सोयाबीन आले कापणीला; पण शेतकऱ्यांना मजूर मिळेना
बुलढाणा – जिल्ह्यात सोयाबीन कापणीला प्रारंभ झाला आहे. परंतु मजूर वर्गाची मनधरणी करुनही ते येत नाही आहेत. त्यामुळे कसे बसे 3200 ते 3500 रुपये एकर सोयाबीन कापायला मजुरांना द्यावी लागत आहे. यावर्षी जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै व ऑगस्ट महिन्यात पेरणीयोग्य पाऊस झाला. या पावसावरच शेतकऱ्यांनी नगदी पीक सोयाबीनचा पेरा घेतला. सर्व संकटांवर मात करत सद्यस्थितीत शेतकरी सोयाबीन कापणीची तयारी करीत आहे. परंतु मजूर मिळत नाही. त्यामुळे हे तिसरे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. सोयाबीनची पेरणी केली. तेव्हा काही दिवसानंतर पावसाची कमी जाणवत होती. त्यानंतर पाऊस पडला. परंतु यंदा दीड महिन्यांपासून येलो मोझॅक ने शेतकऱ्यांना त्रस्त करुन सोडले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या औषधाची फवारणी करुनही काही उपयोग होत नाही. तर केंद्र व राज्य सरकारने सोयाबीनला 6500 हजार रुपये हमी भाव द्यावा, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे.