26/11 देशाला हादरवणारा दिवस

0

काही दिवस असे असतात जे आपल्या नेहमी लक्षात राहतात. त्यातील काही चांगले तर काही वाईट प्रसंगही असतात. पण खरंच काळादिवस ज्याला म्हणता येईल असा एक दिवस भारतातील प्रत्येकाच्या नशिबात आला. तो होता,२६ नोव्हेंबर २००८  26/11 terror attack 

26 नोव्हेंबर 2008… हा मुंबई आणि संपूर्ण देशाला हादरवणारा दिवस. काही दहशतवाद्यांनी मुंबई वेठीस धरली होती. या घटनेला आज 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 166 लोक मृत्यूमुखी पडले होते, तर 300 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. या हल्ल्याच्या कटू आठवणी मात्र प्रत्येक मुंबईकर कधीच विसरु शकणार नाही.  आज संपूर्ण देश दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करत आहे.

2008 मध्ये पाकिस्तानमधून दहा दहशतवादी समुद्राच्या मार्गे मुंबईत घुसले होते. लष्कर ए तोयबाच्या या अतिरेक्यांनी देशाची शान म्हणून ओळख असलेल्या मुंबईवर केला होता, हॉटेल ताज, नरिमन हाऊस, होटल ओबेरॉय आपल्या ताब्यात घेऊन मुंबईला वेठीस धरलं होतं. आज या हल्ल्याला पंधरा  वर्ष पूर्ण झाली आहे. आजही मागे वळून पाहिलं तर नुसत्या कल्पनेने अंगावर काटा येतो.

परदेशी नागरिकांचाही मृत्यू झाल्याने जगाचे लक्ष्य 

पाकिस्तानमधून आलेल्या या दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात सर्वाधिक मृत्यू हे छत्रपती शिवाजी टर्मिनस इथे झाले. तर हॉटेल ताजमध्ये दहशतवाद्यांनी 31 जणांचा जीव घेतला. अतिरेक्यांनी एक टॅक्सी बॉम्बने उडवली होती. या हल्ल्यात भारतीयांसह अनेक परदेशी नारिकांचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे संपूर्ण जग हादरलं होतं. या हल्ल्यांमध्ये कमीतकमी १९७ व्यक्ती ठार झाल्या. तर २९३ जण जखमी झाले होते. परदेशी नागरिकांपैकी चार ऑस्ट्रेलियन, चार अमेरिकन, तीन केनेडियन, तीन जर्मन, दोन इस्रायली-अमेरिकन, दोन इस्रायली, दोन फ्रेंच तर प्रत्येकी एक ब्रिटिश-सायप्रॉइट, चिनी, इटालियन, जपानी, जॉर्डनी, मलेशियन, मॉरिशयन, मेक्सिकन, सिंगापूरी, थाई आणि मेक्सिकन लोकांचा समावेश होता.

मुंबई पोलिसांची शर्तीची लढाई

या दशहतवाद्यांशी मुंबई पोलिसांनी लढला दिल्या. यात या हल्ल्यादरम्यान हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक पोलीस कर्मचारी शहीद झाले. दहा दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याला जिंवत पकडण्यात पोलिसांना यश आलं. हा दहशतवादी म्हणजे अजमल आमीर कसाब.पोलीस कर्मचारी तुकाराम ओंबळे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या अंगावर गोळ्या झेलून कसाबला जिवंत पकडलं

चार वर्षांनंतर कसाबला फाशी

अजमल कसाबला जिवंत पकडल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचा खरा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यास मदत झाली. त्याने न्यायालयात गुन्ह्याची कबुली देल्याने कसाबला मे 2010 मध्ये विशेष कोर्टाने दोषी ठरवून मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. त्यानंतर हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेलं. तिथेही फाशीची शिक्षा कायम राहिल्यानंतर कसाबने राष्ट्रपतींकडे दया अर्ज केला. राष्ट्रपतींनीही त्याचा अर्ज फेटाळला. परंतु कसाबला फाशी देण्यास उशीर होत असल्याने नागरिकांमध्ये रोष होता. अखेर  21 नोव्हेंबर 2012 रोजी सकाळी साडेसात वाजता कसाबला पुण्यातील येरवडा कारागृहात फासावर लटकवण्यात आलं.