राज्यात हजारो हेक्टर शेतीचे नुकसान

0

 

-धनंजय मुंडे (Dhananjay Munde)

(Mumbai)मुंबई-राज्यातील सुमारे १६ ते १७ जिल्ह्यांमध्ये मागील दोन दिवसात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने हजारो हेक्टर शेती बाधित झाली असल्याचे वृत्त असून सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. (Agriculture Minister DhananJay Munde)

धनंजय मुंडे म्हणाले, आणखी पुढचे काही दिवस अवकाळी पावसाचा अंदाज आहे. या अवकाळी व गारपीटीने रब्बीतील कापूस, कांदा, द्राक्ष, केळी, मोसंबी, डाळिंब, काढणीस आलेला भात, ज्वारी, गहू, हरभरा यांसह भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाल्याचेही निदर्शनास आले आहे. कृषी, मदत व पुनर्वसन आणि महसूल विभागाच्या वतीने झालेला पाऊस व त्यामुळे झालेले नुकसान याची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. जिथे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तिथे मदत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याची शासनाची भूमिका आहे, असेही मुंडे म्हणाले.