कार्यक्रमाच्या प्रास्तविक भाषण दरम्यान महा मेट्रोचे संचालक श्री अनिल कोकाटे यांनी सांगितले कि, महा मेट्रो सुरुवातीपासूनच समाजाच्या हितपयोगी अनेक उपक्रम करत असून शहरात मेट्रो रेल प्रकल्पाच्या दृष्टीने पर्यावरणपूरक आणि सुरक्षित अशी परिवहन प्रणाली कार्यरत आहे. शहरातील वाढती रहदारी बघता, नागपूरकरांच्या सुरक्षित प्रवासाकरिता जन आक्रोश आणि महा मेट्रोने संयुक्तपणे कार्य करण्यासंदर्भात आवाहन त्यांनी केले.
जन आक्रोश चे संस्थापक सचिव श्री रवी काचखेडीकर यांनी सांगितले कि नागपूरकर मेट्रो रेल प्रकल्पाला चांगला प्रतिसाद देत असून जन आक्रोश आणि महा मेट्रो मिळून शहरातील नागरिकांना मेट्रोचे महत्व पटवून देत रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी करण्या संबंधी जनजागृती करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
डॉ. अशोक करंदीकर (वरिष्ठ सभासद जनआक्रोश) : नागपूरकर मेट्रोने प्रवास करत असल्याने रस्त्यावरील खाजगी वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मेट्रोची प्रवासी सांख्य वाढली तर रस्त्यावरील रहदारी आणखी कमी होईल आणि पर्यायाने प्रदूषण कमी होईल, असे मत जनआक्रोश चे वरिष्ठ सदस्य डॉ. अशोक करंदीकर (Dr. Ashok Karandikar)यांनी व्यक्त केले. समाजाचे व्यापक हित लक्षात घेत जन आक्रोश महा मेट्रो सोबत कार्य करत प्रवासी संख्या वाढवण्याकरता हातभर लावेल असे आश्वासन त्यांनी दिले.
डॉ. अनिल लद्दड (अध्यक्ष – जनआक्रोश) : यांनी सांगितले कि, मेट्रोचा उपयोग करण्याकरिता नागरिक हळू-हळू तसेच नागपूर मेट्रो कडे वळत आहे ग्रिडीच्या ठिकाणी स्वतःचे वाहनांचा उपयोग न करता मेट्रोने प्रवास करत असल्याचे अनुभव त्यांनी यावेळी नमूद केले.
आयोजित चर्चा सत्रामध्ये महा मेट्रोचे वतीने श्री महेश मोरोणे यांनी मल्टिमॉडेल इंटीग्रेशन, श्री अखिलेश हळवे यांनी सामाजिक जागरूकता, श्री सुधाकर उराडे यांनी प्रवाश्यांचे समाधान यावर आपले मत व्यक्त केले. श्रीमती रश्मी मेदनकर यांनी प्रास्ताविक तसेच आभार प्रदर्शन केले.