शरद पवार आणि तटकरे यांची बरोबरी होऊ शकत नाही – जयंत पाटील

0

 

कोल्हापूर- रायगडचा खासदार हा इंडिया आघाडीचाच होणार, सुनील तटकरे यांना आम्ही निवडून दिले ही आमची मोठी चूक झाली होती. जिथे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि आम्ही एकत्र आलो त्यावेळी तिथली निवडणूकच एकतर्फी होते. शरद पवार आणि तटकरे यांची बरोबरी होऊ शकत नाही, ते तटकरेंना गांभीर्याने घेत नाहीत असे प्रतिपादन पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
पाटील म्हणाले,रायगडमध्ये आम्ही सर्वांनी एकत्रित सर्व निवडणुका लढवण्याचं ठरवलेलं आहे.नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत इंडिया बँकेचा मोठा प्रमाणात विजय झालेला आहे.रायगडमध्ये कोणीही उभे राहिले तरी इथं तीन पक्ष एकत्र आहेत तेव्हा विजय त्यांचाच होतो. यापूर्वी भारतीय जनता पार्टी कधीही यात्रा करत नव्हती.आम्ही देखील घरोघरी फिरत आहोत आणि जास्तीत जास्त इंडिया आघाडीला मतदान कसं पडेल याकडे आमचं लक्ष केंद्रित आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी विचलित करण्याचा प्रयत्न केला मात्र ते सगळं उलट झाले आहे गेल्या लोकसभेच्या निवडणुकी वेळी धनगरांना आरक्षण देतो असं म्हटलं होतं.मराठा समाजाला सांगितलं होतं की, आम्ही कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला आरक्षण देऊ, ओबीसींना सुद्धा आम्ही वेगळ्या सवलती देऊ असं सांगितलं होतं पण आता लोक फसणार नाहीत किती फसवायचा प्रयत्न केला तरी फसणार नाहीत.त्यावेळी आम्ही महाविकास आघाडीत गेलो आम्ही महाविकास आघाडीशी प्रामाणिक राहिलो मात्र त्यावेळी काही लोकांनी आमच्या विरोधात राजकारण केलं, आमचे जे प्राकृतिक पक्षांचे मतदार संघ होते त्या मतदारसंघांमध्ये आम्हाला दगा दिला.मात्र, सोंगाडे कितीही येतील आणि जातील जनतेने ठरवलंय यांना घरात बसवायचं. निवडणूका घ्यायला हे सरकार घाबरत आहे. आरक्षणाच्या कारणावरून हे सरकार ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेते मात्र मुदत संपलेल्या महापालिकेच्या निवडणुका घेत नाही.बावनकुळेंना आम्ही गांभीर्याने घेत नाही. आज सर्व बीजेपी विरोधी शक्ती या देशात आणि महाराष्ट्रात एकत्र आल्याने अनेकांना चिंता वाटत आहे. इंडिया आघाडी स्थापन झाल्यामुळे या देशातील वातावरण बदललेलं आहे .आरोग्यमंत्री नेहमी सभागृहामध्ये भाषणामध्ये ते स्वतः अधिकारी भ्रष्ट असल्याचे बोलत असतात.औषधावाचून तडफडून मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे या राज्यात असं पूर्वी कधीही घडलं नव्हतं, ही बाब लज्जास्पद आहे असे आमदार जयंत पाटील म्हणाले.