
मुंबईः उद्धव ठाकरे सरकारच्या काळात ३५ हजार सदनिकांच्या प्रकल्पात २० हजार कोटींच्या घोटाळ्याचे कारस्थान रचण्यात आले होते, असा दावा करणारी याचिका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. उद्धव ठाकरे सरकारने मार्च २०२२ मध्ये मुंबईत ३५ हजार प्रकल्पग्रस्त सदनिका बनविण्यासाठी कंत्राट काढले होते. शाहिद बलबा आणि अतुल चोरडिया या बिल्डरांना ६ कंत्राट दिली. त्यातला एक प्रकल्प मुलुंड पूर्व केळकर कॉलेज जवळ दुसरा कांजुरमार्ग इथे चांदणी बोरी इथे होणार होता. तर प्रभादेवी येथे आणि जुहू मालाड येथेही असेच प्लान होते. या प्रकल्पाच्या माध्यामातून बिल्डर लोकांनी २० हजार कोटी लुटण्याचे कारस्थान रचले होते. मुख्यमंत्र्यांनी मुलुंडचा प्रकल्प थांबावा तसेच एसआयटी नेमून चौकशी होईपर्यंत आयुक्त आय.एस. चहल यांना पदावरून बाजुला करण्यात यावे, अशी माहिती त्यांनी याचिकेत केली आहे. सोमय्या यांनी या प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारलाही प्रतिवादी म्हणून नमूद केले आहे.