वर्षभरात एक हजार कोटींच्या औषधांची विक्री

0

पंतप्रधान भारतीय जनऔषधी योजनेचा विक्रम

नवी दिल्ली, 24 डिसेंबर  : प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेने (PMBJV) वर्षभरात एक हजार कोटी रुपयांच्या औषधांची विक्री करत, नवा विक्रम प्रस्थापित केलाय. देशातल्या 785 जिल्ह्यात असलेल्या जन औषधी केंद्रातील औषध विक्रीमुळे जनतेच्या सुमारे 5 हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे.

देशातील 5 राज्यांमध्ये विकसीत भारत संकल्प यात्रेला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, आत्तापर्यंत, शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांनी जनऔषधी केंद्रांमुळे 25 हजार कोटी रुपयांहून अधिक रुपयांची बचत केली आहे. जन औषधी केंद्रातून होणाऱ्या विक्रीत झालेली ही लक्षणीय वाढ, अधिकाधिक समुदायांना सेवा देत, व्यापक लोकांपर्यंत पोहोचण्याच्या योजनेच्या वचनबद्धतेचाच पुरावा आहे. गेल्या 9 वर्षात, जन औषधी केंद्रांच्या संख्येत 100 पटीहून अधिक वाढ झाली आहे. 2014 मध्ये ही संख्या केवळ 80 होती आणि आता ती वाढून देशातील जवळजवळ सर्व जिल्ह्यांचा समावेश असलेली सुमारे 10 हजार केंद्रे सुरू झाली आहेत. पंतप्रधानांनी त्यांच्या 2023 च्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात देशभरात 25 हजार प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे उघडण्याची घोषणा केली होती. तसेट झारखंडमधील देवघरमध्ये पंतप्रधानांनी 30 नोव्हेंबर 2023 रोजी एम्स येथे 10 हजाराव्या जनऔषधी केंद्राचा आभासी पद्धतीने शुभारंभ केला होता. देशातल्या लोकांपर्यंत, सहजपणे औषधे पोहोचण्यात यामुळे मोठी मदत होत आहे.

मार्च 2026 पर्यंत देशभरात 25,000 जनऔषधी केंद्रे उघडण्याचे लक्ष्य, सरकारने निश्चित केलं आहे. त्यानुसार, देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये नवीन जनऔषधी केंद्रे उघडण्यासाठी ऑनलाइन अर्ज पीएमबीआयच्या अधिकृत वेबसाइटद्वारे, i.e. – www.janaushadhi.gov. करता येतो. तसेच सविस्तर माहितीसाठी, कोणीही राष्ट्रीय टोल-फ्री क्रमांक 1800.180.8080. द्वारे संपर्क साधू शकतो. दुर्गम आणि ग्रामीण भागात औषधांचा पुरवठा करण्यासाठी देशभरात 36 वितरक कार्यरत आहेत. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पीएमबीजेव्हायने आपल्या उत्पादनात अनेक आयुर्वेदिक उत्पादने जोडली आहेत आणि ती लोकांना परवडणाऱ्या दरात सहज उपलब्ध आहेत.