


राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज
राज्यातील काही भागात कडक ऊन तर काही भागात दुपारनंतर ढगाळ वातावरणासह वादळी पाऊस पडत आहे. हवामान विभागाने पुढील ५ दिवस विदर्भासह राज्यातील इतर काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिला. हवामान विभागाने कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, नगर आणि नाशिक तसेच खानदेश, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात काही भागात विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला. तर विदर्भातील बुलडणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा वाशीम, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिला. उद्यापासून पुढील पाच ५ दिवस विदर्भात काही ठिकाणी विजा आणि वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागातही वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान आणि काही भागात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.