

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी देखील देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाचे निर्देश देत पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढा आणि तात्काळ परत जातील याची खात्री करा, असे निर्देश दिले आहेत.
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम मधल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलाकडून अनेक कारवाई सुरू करण्यात आली असून दहशतवाद्यांच्या ठाव ठिकाण्यावर जोरदार घाला घालण्यात येत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानं जोरदार तयारी देखील सुरु केली आहे.
अशातच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (Narendra Modi) निष्पाप भारतीयांचे बळी घेणाऱ्या अतिरेक्यांना गाडण्याचा इशारा दिला असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी देखील देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने दिलेली मुदत संपुष्टात आल्यानंतर एकही पाकिस्तानी नागरिक देशात थांबू नये, याची खात्री करावी. सोबतच पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढा आणि तात्काळ परत जातील याची खात्री करा, असे निर्देश दिले आहेत. अमित शाहांच्या या निर्णयानंतर राज्यातील पाकिस्तानी नागरिकांच्याबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ती खालील प्रमाणे आहे.
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती पाकिस्तानी?
1) अकोला (AKOLA) – 22
2 अहिल्यानगर (AHILYANAGAR) 14
3 अमरावती (AMRAVATI C)- 117
4 अमरावती (AMRAVATI R)- 1
5 छत्रपती संभाजीनगर (AURANGABAD C)- 58
6 छत्रपती संभाजीनगर (AURANGABAD R) – 1
7 छत्रपती संभाजीनगर ( AUR. RLY) 0
8 भंडारा (BHANDARA 0)
9 बीड (BEED)- 0
10 बुलढाणा (BULDHANA)- 7
11 चंद्रपूर ( CHANDRAPUR)- 0
6 धुळे (DHULE) 6
13 धारशिव (DHARASHIV)- 0
14 गडचिरोली (GADCHIROLI)- 0
15 गोंदिया (GONDIA)- 5
16 हिंगोली (HINGOLI)- 0
17 जळगाव (JALGAON)- 393
18 जालना (JALNA)- 5
19 कोल्हापूर (KOLHAPUR) – 58
20 लातूर (LATUR) – 8
21 मुंबई (MUMBAI RLY)- 2
22 मुंबई (MBVV)- 26
23 नाशिक (NASHIK C)- 8
24 नाशिक (NASHIK R)- 2
25 नागपूर (NAGPUR C)- 2458
26 नागपूर (NAGPUR R)- 0
27 नागपूर (NAGPUR RL)Y 0
28 नांदेड (NANDED) 4
29 नंदुरबार (NANDURBAR)- 10
30 नवी मुंबई (NAVI MUMBAI)- 239
31 परभणी (PARBHANI) 3
32 पालघर (PALGHAR) – 1
33 पिंपरी चिंचवड (PIMPRICHINCHWAD) -290
34 पुणे (PUNE) – 114
35 पुणे (PUNE R) -0
36 पुणे (PUNE RLY)- 0
37 रायगड (RAIGAD)- 17
38 रत्नागिरी (RATNAGIRI) 4
39 सातारा (SATARA)- 1
40 सांगली (SANGLI)- 6
41 कोल्हापूर (SOLAPUR C) – 17
42 सोलापूर (SOLAPUR R) 0
43 सिंधुदुर्ग (SINDHUDURG) 0
44 ठाणे (THANE C) 1106
45 ठाणे (THANE R) 0
46 वर्धा (WARDHA) 0
47 वाशिम (WASHIM) 6
48 यवतमाळ (YAVATMAL) 14
एकूण -5023
दरम्यान, पुढे आलेल्या अकडेवाडीनुसार, एकट्या नागपूर शहरात सर्वाधिक 2 हजार 458 पाकिस्तानी आढळले असून ठाणे शहरात 1106 पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत. तर मुंबईत 14 पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती समोर आली आहे. यामधील फक्त 51 पाकिस्तान्यांकडं वैध कागदपत्रं मिळाली आहेत. धक्कादायक म्हणजे, महाराष्ट्रात आलेले 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याचे आढळून आले आहे. 107 पाकिस्तान्यांचा पोलीस वा अन्य संस्थांना पत्ताच लागत नाहीय. दरम्यान जे सध्या राज्यात आहे त्यांचावर केव्हा आणि कशी कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.