चंद्रपुर : जिल्ह्यात वादळी वाऱ्यांमुळे नागरिकांच्या घरांचे तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष मोक्यावर पंचनामे करून तात्काळ आपद्ग्रस्तांना मदत करण्याचे आदेश वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.
या वादळी वाऱ्यांमुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतकरी, नागरिक यांच्या पिकांचे व घरांचे नुकसान झाले आहे. यांसदर्भात नुकसानीचे सर्व्हेक्षण करून पंचनामे करावे व नुकसान भरपाई तात्काळ अदा करण्यासाठी योग्य कार्यवाही करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवार दिनांक ११ जून २०२३ रोजी तातडीने चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
Related posts:
बजाज चौकातील उड्डाण पुलावरील लाईट तात्काळ सुरु करा : खासदार अमर काळे
November 1, 2025LOCAL NEWS
चंद्रपूर जिल्ह्यातून वगळलेल्या नऊ तालुक्यांना पुन्हा 'नक्षलग्रस्त' म्हणून समाविष्ट करा
November 1, 2025LOCAL NEWS
शहरातील रस्त्यांचे सिमेंटिकरण करा : वीर अशोक सम्राट संघटनेचे मुख्याधिकारी यांना निवेदन
November 1, 2025LOCAL NEWS
















