

हवामान विभागाने दिला इशारा
महारष्ट्र (Maharashtra) :- राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र, पुन्हा एकदा राज्याच्या काही भागांमध्ये आज पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणर असल्याचा अंदाज आहे. आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तण्यात आला आहे.
काही ठिकाणी पावसासह आणखी एका संकटाचा इशारा देण्यात आला आहे. नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली या जिल्ह्यांमध्येही हलक्या पावसासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पुण्यामध्ये आज ढगाळ आकाश राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
जुलैला अखेरीस झालेल्या मुसळदार पावसाने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून विश्रांती घेतली आहे. मुंबईसह उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. पाऊस ओसरल्याने पुन्हा एकदा उकाडा जाणवू लागला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबई तसेच ठाणे , पालघर भागात हलक्या सरींचा अंदाज हवामान (Maharashtra Weather Update) विभागाने व्यक्त केला आहे. शहर परिसरात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला काही भागात पाऊस झाला. मात्र, त्यानंतर पावसाची दडी मारली आहे. काही भागात अधूनमधून पाऊस कोसळत आहेत. परंतु ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झालेला नाही. त्यामुळे मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागत आहे.
दरम्यान, पुढील काही दिवस मुंबईत अशीच स्थिती कायम असणार आहे. मात्र काही भागात हलक्या सरी कोसळतील. या काळात संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण राहील. काही भागात पाऊस होईल, तर काही भागात कोरडे वातावरण असेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.