शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारची भूमिका आहे – फडणवीस

0

 

नागपूर – राज्यात अवकाळी पावसाने चिंता वाढविली आहे. अवकाळी पावसा संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत.कुठे किती नुकसान झाले याचा प्राथमिक अहवाल घेऊन पाठवण्याचा सूचना दिल्या आहेत. निश्चितपणे राज्य सरकारची भूमिका कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याची असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

फडणवीस म्हणाले, वेगवेगळ्या ठिकाणी रब्बी पीक वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहे, पण जिथे नुकसान होईल त्याठिकाणी सरकार नक्कीच मदत करणार आहे. आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष सुनावणी
यासंदर्भात मी काहीच बोलू शकत नाही. हे ज्यूडीशियल मॅटर आणि ट्रीब्युनलचा दर्जा त्या सुनावणीला आहे. त्यावर बोलणं योग्य होणार नाही. जागा वाटप बाबतीत मी कालही सांगितले आहे, पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगतो, अजून आमची याबाबत चर्चा व्हायची आहे, चर्चेनंतरच जागावाटप सूत्र ठरेल.

मात्र त्याचा आधार काय असेल, तर जो ज्या जागांवर लढला आहे, तो साधारणपणे त्या जागा लढवणार
मात्र हे एकदम काटेकोर राहणार नाही, त्यात बदल होऊ शकतात असे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.