

जोरदार घोषणाबाजी; आंदोलक आक्रमक
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा, ओबीसी, धनगर इत्यादि समजाकडून आपल्या वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन सरकारकडे या मागण्या लावून धरल्या आहे. मात्र, राज्यात धनगड ही जातच अस्तित्वात नाही, असे वारंवार धनगर नेत्यांकडून सांगितले जात होते. आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे.
यावर कुठलाही तोडगा निघत नसल्याने धनगर समाजाचे कार्यकर्ते मंत्रालयात आंदोलक करत आहे. यावेळी काही कार्यकर्त्यांनी आक्रमक पाऊल उचलले आणि थेट सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या.
पोलिसांनी सुरक्षा जाळीवर उतरून या आंदोलकांना बाहेर काढलं आहे.