शेतकरी संघटना ६ जागा लढविणार- राजू शेट्टी

0

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे लोकसभेच्या सहा जागा लढविणार असल्याचे संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. शेतकरी संघटना महाविकास आघाडीसोबत जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. ही भेट शेतकरी प्रश्नावर होती, असा दावा त्यांनी केला. आपण सध्यातरी महाविकास आघाडी मध्ये जाणार नसून स्वतंत्र सहा जागा लढवणार ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात जोपर्यंत महाविकास आघाडीकडून काही गोष्टींचे स्पष्टीकरण मिळत नाही, तोपर्यंत कुठलाही विचार करणार नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
राजू शेट्टी हे स्वतः हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. तर रविकांत तुपकर हे बुलढाण्यातून लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय शेतकरी संघटना कोल्हापूर, सांगली, माढा आणि परभणी या इतर चार जागा लढविणार आहे.