

उद्योग समूहांनी उद्योग विकासासाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळ मिळवण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालय उभारणीच्या माध्यमातून पुढाकार घेणे आवश्यक आहे . एव्हिएशन , माहिती तंत्रज्ञान , पर्यटन अशा क्षेत्रांमध्ये विदर्भात रोजगार निर्मितीला खूप वाव असून यासाठी उद्योग समूहांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे . या उद्योगसमूहांनी स्टार्टअप परिसंस्था , कच्च्या मालाला तसेच स्थानिक मनुष्यबळाला योग्य रीतीने चालना देणे आवश्यक असून परिक्षण केलेल्या तंत्रज्ञानाने या क्षेत्रामधील उद्योग विकास करावा असे देखील गडकरी यांनी नमूद केले .
नागपूर मध्ये मदर डेअरी च्या 450 कोटीच्या प्रकल्पाच्या माध्यमातून येथील दुग्धविकासाला चालना मिळणार असून यातून 5 ते 7 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे , अशी माहिती देखील त्यांनी दिली .
दिवसभर चालणाऱ्या या कॉन्क्लेव्हमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आणि उद्योग विकासा संदर्भात योगदानाचे विचारमंथन करण्यात आले . यामध्ये सीआयआय विदर्भ प्रदेशचे पदाधिकारी आणि विदर्भातील 13 शिक्षण संस्थामधील शैक्षणिक तज्ञ यांनी सहभाग घेतला .या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सीआयआय विदर्भ क्षेत्रचे उपाध्यक्ष व्ही .सी जामदार यांनी केले .