

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे बुलढाणा जिल्ह्याचे पालकत्व आल्यापासून ते जिल्ह्यात केवळ तीन वेळा शासकीय कामासाठी आले. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली शेतकरी खचून गेला तरीही पालकमंत्री जिल्ह्यात आले नसल्याचा आरोप करत, सत्याग्रह शेतकरी संघटनेच्या वतीने खामगाव शहर पोलीस ठाण्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी पालकमंत्र्यांना तात्काळ शोधून द्यावे आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी देखील या तक्रारीमध्ये करण्यात आली असल्याची माहिती राजू नाकोडे, जिल्हा संयोजक,सत्याग्रह शेतकरी संघटना यांनी दिली.