गोंदिया – बल्लारशाह रेल्वे मार्गाच्या विकासासाठी मोठा निर्णय

0

दुसऱ्या रेल्वे लाईनला मंजुरी, मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या विशेष प्रयत्नाला यश…

दि. ०४ एप्रिल २०२५

गोंदिया – बल्लारशाह या महत्त्वाच्या रेल्वे मार्गाच्या विकासासाठी मोठी आणि ऐतिहासिक घोषणा करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी २४० कि.मी लांबीच्या दुसऱ्या रेल्वे लाईनला मंजुरी दिली असून, या प्रकल्पासाठी ४,८१९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

या निर्णयाचे मुख्य फायदे:
दुहेरी मार्गामुळे गाड्यांची गती वाढेल आणि विलंब कमी होईल.
दुसरी लाईन आल्याने प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग मिळेल. औद्योगिक आणि आर्थिक वाढ: विदर्भातील उद्योग व वाणिज्य केंद्रांना चालना मिळेल.पर्यटन आणि रोजगार संधी: सुधारित रेल्वे सुविधांमुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक रोजगार संधी वाढतील.

विदर्भातील नागरिकांसाठी दिलासा!
हा प्रकल्प गोंदिया,भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे नागरिक, व्यापारी, विद्यार्थी आणि प्रवाशांना मोठा फायदा होईल, असे मत मा.खा. तथा भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी व्यक्त केले. तसेच, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे मनःपूर्वक आभार मानले.
मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांचा महत्त्वपूर्ण पाठपुरावा
गोंदिया – बल्लारशाह रेल्वे मार्गाच्या विस्तारासाठी खासदार असतांना मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे विशेष मागणी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच हा निर्णय घेण्यात आला. विदर्भात रेल्वेचे विस्तृत जाळे निर्माण करण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले असून, या प्रकल्पामुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार आहे.

नव्या रेल्वे लाईनमुळे उज्ज्वल भविष्याची पायाभरणी

या प्रकल्पामुळे आधुनिक आणि वेगवान रेल्वे सेवा उपलब्ध होणार असून, विदर्भाच्या दळणवळणात क्रांतिकारी बदल घडेल. स्थानिकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असून, भविष्यातील प्रवास आणखी सुलभ होईल, असे मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी सांगितले.

या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी मान. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री मान. देवेंद्रजी फडणवीस,केंद्रीय मंत्री मान.नितिन जी गडकरी यांचे विशेष आभार मानले!