विरोधक राजकारणातच खुश -चंद्रशेखर बावनकुळे

0

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होते तेव्हा भयंकर घटना घडली होती. चेंगराचेंगरीचे प्रकारही झाले होते. असे प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून सरकारने व्यवस्था उभी केली. याविषयीची संपूर्ण माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांना आणि जनतेला दिली. सरकारकडून त्यांनी आवाहनही केलं की विरोधी पक्षाने राजकारण करु नये. कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जी घटना घडली तेव्हा आम्हीही राजकारण केलं नाही. उलट मदत कशी पोहचवता येईल यावरच भर दिला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस काही गोष्टी आक्रमकपणे बोलताना दिसत आहेत. मात्र सरकारने आवाहन केलं आहे तर ते स्वीकारलं पाहिजे. हा विषय राजकारणाचा नाही असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. वारकऱ्यांच्या घटनेवर त्यांनी हे भाष्य केलं आहे.

 

आळंदीत वारकऱ्यांवर लाठीमार झाल्याचा आरोप होतो आहे. त्यावरुन विरोधक सरकारवर तुटून पडले आहेत. अशात आता असा प्रकार घडलेला नाही. विरोधक राजकारण करत आहेत, खरंतर अशा गोष्टींचं राजकारण करायचं नसतं तरीही ते केलं जातं आहे असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सगळ्या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा यापेक्षा भयंकर घटना घडली होती असंही त्यांनी म्हटलं आहे.