
मुंबई- पक्षाध्यक्ष अजित पवार आणि प्रमुख सहकाऱ्यांच्या सुचनेप्रमाणे मी राज्यसभेसाठी आज अर्ज भरलेला आहे.मात्र, लोकसभेची टर्म संपली नसताना राज्यसभेचा फॉर्म भरला यावरुन तर्कवितर्क चालू आहेत, पण अनेकदा राजकीय तडजोडी कराव्या लागतात.आमची लोकसभेची रिक्त जागा आमच्याकडेच राहणार आहे.अपात्रतेचा विषय इथे नाही. मी दोन्ही गटात सर्वमान्य असेल तर हे चांगलंच आहे.आमची महायुती एकदम घट्ट आहे.देशात पुन्हा एनडीएचीच सरकार येईल .महाराष्ट्रात देखील ४५ जागा महायुतीच्या येणार , असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला.