अहिल्याबाईंनी घेतला होता समाजाला सशक्त करण्याचा ध्यास

0

एकपात्री दिर्घांकाचे उत्‍कृष्‍ट सादरीकरण

ज्या काळात समाज शास्त्रांचा मथितार्थ योग्य रीतीने समजून न घेता चुकीचे पायंडे पाडून विघटन करत होता त्याचवेळी धर्मपंडितांना आणि समाजातील राजकीय वरिष्ठांना न दुखावता अहिल्याबाई होळकर यांनी शास्त्रांमधील विचारांची योग्य मांडणी केली व विचारधारेत आमुलाग्र बदल यांनी केला. अशा समाजाला सशक्त करण्याचा ध्यास घेतलेल्‍या कर्मयोगगिनी अहिल्याबाई होळकर यांच्‍या जीवनावर आधारित एकपात्री प्रयोगाचे उत्‍कृष्‍ट सादरीकरण करण्‍यात आले.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (Punyashloka Ahilyabai Holkar) यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या कर्तृत्वाची, निष्ठेने आणि अत्यंत कुशलतेने केलेल्या राज्यकारभाराची तसेच धर्माधिष्ठित न्यायव्यवस्थेने कार्य करण्याची गाथा सर्वांना पुन्हा एकदा कळावी, या उद्देशाने मानिनी बहुउद्देशीय संस्था निर्मित आणि नटराज आर्ट्स ऍण्ड कल्चर सेन्टर नागपूर द्वारा प्रस्तूत “कर्मयोगिनी अहिल्याबाई होळकर” हा एकपात्री प्रयोग नुकताच धरमपेठ येथील नटराज आर्ट्स अँड कल्चर सेंटर येथे पार पडला.
डॉ. मंजुश्री सरदेशपांडे लिखित या प्रयोगात जाणत्या अभिनेत्री डॉ. दीपलक्ष्मी दिलीप भट यांनी अत्यंत चपखलपणे करून अहिल्‍याबाई होळकर यांचे कार्य आपल्‍या अभिनयाच्‍या माध्‍यमातून लोकांपर्यंत पोहोवण्‍याचा प्रयत्‍न केला. उपस्‍थ‍ितांनी त्‍यांच्‍या अभिनयाची प्रशंसा केली. या एकपात्री दीर्घांकाचे दिग्दर्शन आणि नेपथ्य स्वप्निल बोहटे यांचे होते तर संगीत अनिल इंदाणे व प्रकाशयोजना वैदेही चवरे यांनी सांभाळली.
कार्यक्रमाला धरमपेठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उल्हास औरंगाबादकर, नटराज आर्ट्स अँड कल्चर सेंटररचे प्राचार्य डॉ. रविंद्र हरदास, डॉ. मंजुश्री सरदेशपांडे व धरमपेठ शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्‍येने उपस्‍थ‍ित होते.