आरक्षणाचा वाद हा सरकारने सुरु केला आहे- विजय वडेट्टीवार

0

नागपूर – आरक्षणाचा वाद हा सरकारने सुरु केला आहे. मुळात वाद हा महायुतीने उभा केला. सरकारने शब्द दिला तर पूर्ण करावा,
आपसात भांडण लावण्याचे काम केलं. आता परिणाम भोगावे लागतील.
आश्वासने कशाला देता? असा सवाल मराठा आरक्षण प्रकरणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला आहे. मविआत तिकीट वाटप हा वादाचा मुद्दा होऊ शकत नाही.आम्ही मेरिटवर जाऊ. शेवटी निर्णय हायकमांड ठरवणार. अजून चर्चा झाली नाही. त्यांचं काय बोलणं झालं? मला माहित नाही. बैठकीत चर्चा करू.राज्यातील जागा वाटपाची अजून चर्चा झाली नाही.अंतिम निर्णय केंद्रीय समितीचा आहे. चर्चा नसताना या उगीचच वावड्या आहेत. संजय राऊत काय म्हणाले त्यांना म्हणू द्या.मेट्रो मुंबई संदर्भातराज्याच्या तिजोरीतून 134 कोटी खर्च झाला आहे. 10 ते 15 टक्के खर्च झाला आहे.हेच सर्वत्र सुरू आहे. राज्यात 35 हजार कोटी कंत्राटदाराचे थकले आहेत.
28 डिसेंबर सभा जोरात तयारी सुरू आहे. 1920 नंतर विदर्भात प्रथमच काँग्रेसचा स्थापना दिवस नागपुरात 28 डिसेंबर रोजी साजरा होत आहे.
यावर विजय वडेट्टीवार यांनी भर दिला.